एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलरच्या दमदार भागीदारीने भारताचा पराभव
याविजयाने दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचली
सौजन्य- आयसीसी (ट्विटर)
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (३० ऑक्टोबर) रोजी ग्रुप बी मधील सामना झाला. टी२० विश्वचषक २०२२ मधील हा भारताचा तिसरा सामना होता. टी२० विश्वचषक २०२२ मधील हा ३० वा सामना असून पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला आणि दक्षिण आफ्रिकेने तो सामना पाच गडी राखून जिंकला. या विजयाने आफ्रिका संघ उपांत्य फेरीच्या एक पाऊल अजून जवळ गेला आहे. एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलरच्या दमदार भागीदारीने भारताला विजयापासून लांब नेले. सुर्यकुमार यादवची ६८ धावांची खेळी व्यर्थ गेली. लुंगी एनगिडीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
टीम इंडियाने पहिल्या दहा षटकात शानदार गोलंदाजी केली. डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन गडी झटपट बाद करत दक्षिण आफ्रिका संघाला अडचणीत आणले. पण त्यानंतर डेव्हिड मिलर आणि एडन मार्कराम यांनी शानदार अर्धशतके झळकावत दक्षिण आफ्रिकेला विजयाचा उंबरठ्यावर नेले.खराब चेंडूंचा समाचार घेत त्यांनी संघाला विजयाच्या जवळ नेले. यादरम्यान दोघांना टीम इंडियाने गचाळ क्षेत्ररक्षण करत दोन जीवदान देखील दिले. चौथ्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केल्यानंतर मार्कराम ५२ धावा करत बाद झाला.
मार्कराम बाद झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने खेळत असलेल्या मिलरने १८व्या षटकात अश्विनला दोन षटकार लगावत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नेला. अखेरच्या दोन षटकात १२ धावांची गरज असताना शमीने केवळ सहा धावा देत सामना रंगतदार बनवला. २० व्या षटकात मिलरने दोन चौकार मारत सामना जिंकून दिला. डेव्हिड मिलर ४६ चेंडूत ५९ धावा करत नाबाद राहिला.
तत्पूर्वी, भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाने २० षटकांत ९ गडी गमावून १३३ धावा केल्या. भारताची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाला २३ धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. केएल राहुल ९ धावा तर विराट कोहली १२ धावा काढून बाद झाला. तिघांनाही लुंगी एनगिडीने तंबूत पाठवले. यानंतर अक्षर पटेलच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला दीपक हुडाही अपयशी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. हुडाला नॉर्टजेने यष्टिरक्षक डी कॉकच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर हार्दिक पंड्या दोन धावा करून बाद झाला. एनगिडीने हार्दिकला तंबूत पाठवले.
भारताच्या ४९ धावांवर पाच गडी बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दिनेश कार्तिकसह टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४० चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३० चेंडूंमध्ये टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११वे अर्धशतक ठोकले. या दोघांनी मिळून भारताला १०० धावांच्या पुढे नेले. कार्तिक १६व्या षटकात वेन पारनेलकरवी झेलबाद झाला. त्याचा झेल रिले रुसोने घेतला. कार्तिकला १५ चेंडूत केवळ सहा धावा करता आल्या.
पर्थच्या विकेटवर शॉर्ट पीच चेंडूंनी खेळ बिघडवला, टीम इंडिया हरली
फलंदाजांपेक्षा गोलंदाजांच वर्चस्व
या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर 5 गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला 134 धावांच लक्ष्य दिलं होतं. त्यांनी लास्ट ओव्हरमध्ये हे लक्ष्य पार केलं. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर फलंदाजांपेक्षा गोलंदाजांच वर्चस्व पहायला मिळालं. दक्षिण आफ्रिकेने शेवटचे 2 चेंडू राखून विजय मिळवला. टीम इंडियाने कमी धावसंख्या केली होती. पण शेवटपर्यंत मॅच सोडली नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. अर्शदीपने 2, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतला.
सहजासहजी विजय मिळू दिला नाही
टीम इंडियाने टी 20 क्रिकेटचा विचार करता दक्षिण आफ्रिकेला सोपं लक्ष्य दिलं होतं. पण त्यांना सहजासहजी विजय मिळू दिला नाही. टीम इंडियाने सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला तीन धक्के देऊन बॅकफूटवर ढकललं होतं. अर्शदीप सिंहने दुसऱ्या ओव्हरमध्ये क्विटंन डि कॉक (1) आणि फॉर्ममध्ये असलेल्या राइली रुसौला (०) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
मार्करामची हाफ सेंच्युरी
त्यानंतर मोहम्मद शमीने टेंबा बावुमाला (10) विकेटकीपर दिनेश कार्तिककरवी झेलबाद केलं. 24 धावात त्यांचे टॉप 3 प्लेयर तंबूत परतले होते. पण एडन मार्कराम आणि डेविड मिलरने चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करुन डाव सावरला. मार्करामने हाफसेंच्युरी झळकावली. त्याने 41 चेंडूत 52 धावा करताना 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. हार्दिक पंड्याने त्याचा अडसर दूर केला. डेविड मिलरने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 46 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. यात तीन चौकार आणि तीन षटकार होते.
शॉर्ट पीच चेंडूने घात केला
टीम इंडियाचा आज शॉर्ट पीच चेंडूंनी घात केला. कॅप्टन रोहित शर्मा, (15) विराट कोहली (12) आणि हार्दिक पंड्या (2) हे प्रमुख फलंदाज लुंगी निगीडीने टाकलेल्या शॉर्ट पीच चेंडूच्या जाळ्यात अडकले. पुल खेळण्याचा मोह टीम इंडियाला नडला. टीम इंडियाने आणखी 30-35 धावा केल्या असत्या, तर निकाल कदाचित दुसरा असता.
विराट कोहली उत्तम फिल्डिंर सुद्धा आहे पण …..
विराट कोहली हा क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू आहे. बॅटिंग बरोबर तो फिल्डिंगही उत्तम करतो. आज तो बॅटने विशेष कमाल दाखवू शकला नाही. दोन चौकार मारुन त्याने चांगली सुरुवात केली होती. पण 12 धावांवर तो बाद झाला. विराट कोहली उत्तम फिल्डिंर सुद्धा आहे.
विकेट त्यावेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा होता
धावा वाचवण्याबरोबरच कॅच त्याच्या हातातून सहसा सुटत नाहीत. पण आज पर्थच्या मैदानात असं घडलं. विराट कोहलीच्या हातातून एक सोपा झेल सुटला. 12 व्या ओव्हरमध्ये अश्विन गोलंदाजी करत असताना विराटच्या हातून ही कॅच सुटली. खरंतर एडन मार्करामचा विकेट त्यावेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा होता.
विराटकडून अशी चूक कशी झाली?
टीम इंडियाने 24 धावात दक्षिण आफ्रिकेचे तीन विकेट काढून त्यांना बॅकफूटवर ढकललं होतं. मार्कराम आणि मिलरने डाव सावरुन त्यांची सुटका केली. दोघांनी हाफ सेंच्युरी झळकवली. मार्करामने 52 रन्स आणि मिलरने नाबाद 59 धावा केल्या. मार्करामच्या विकेटची गरज असताना विराटच्या हातातून झेल सुटला. विराटकडून कॅच कशी सुटू शकते? असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. कारण विराट कोहली सर्वोत्तम फिल्डर आहे. विराटच्या हातातून मार्करामचा लॉलीपॉप कॅच सुटल्याच पाहून अश्विनलाही विश्वास बसला नाही. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 134 धावांच लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 2 चेंडू बाकी असताना पूर्ण केलं.