मुंबई : मुंबई खिलाडीज संघाचे मालक पुनित बालन, जान्हवी धारिवाल बालन, गायक बादशाह यांच्या उपस्थितीत मुंबईत संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. या वेळी संघातील सर्व खेळाडूंसह मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर श्री, मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते आणि साहाय्यक प्रशिक्षक शोभी आर. उपस्थित होते. अल्टिमेट खो-खो लीग १४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये होणार आहे.
या प्रसंगी बोलताना ‘‘आमच्याकडे अनुभवी प्रशिक्षक आहेत. देशातील कानाकोपऱ्यातील खेळाडूंचा संघात भरणा आहे. त्यामुळे संघाचा आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न असेल. आमचा सराव योग्य दिशेने सुरू असून लीगमध्ये चमक दाखवण्यासाठी उत्सुक आहोत,’’ असे कोल्हापूरचाकर्णधार विजय हजारे म्हणाला. मुंबई खिलाडीज संघाचे मालक पुनित बालन, जान्हवी धारिवाल बालन, गायक बादशाह यांच्या उपस्थितीत मुंबईत संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. या वेळी संघातील सर्व खेळाडूंसह मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर श्री, मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते आणि साहाय्यक प्रशिक्षक शोभी आर. उपस्थित होते. अल्टिमेट खो-खो लीग १४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये होणार आहे.
खो-खो लीगही लक्ष वेधेल -बालन
‘‘भारतात क्रिकेट वगळता इतर खेळाडूंना म्हणावे तसे महत्त्व मिळाले नाही. खो-खोबद्दल बोलायचे झाल्यास हा आपल्या मातीतला खेळ आहे. अनेकांनी देशात खो-खो हा खेळ संपला असल्याचे म्हटले. मात्र लीगच्या माध्यामातून आम्ही या खेळाला वेगळय़ा स्तरावर नेण्याकरता खेळाडूंना योग्य संधी आणि पािठबा देणार आहोत. ही लीग येणाऱ्या काळात अनेकाच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल,’’ असे संघ मालक पुनित बालन म्हणाले.