NHI/MUMBAI
ख्यातनाम धर्मराज अप्पासाहेब रणदिवे यांचा जन्म १५ मार्च १९३३ रोजी खरशिंगे पोस्ट पळशी,ता.खटाव, जिल्हा. सातारा येथील खेडेगावात झाला. वरळी कोळीवाडा येथील साने गुरुजी कथामालेचे चालते बोलते वैभवच होते.
१९५२ साली ज्युपीटर टेक्स्टाईल मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून रुजू झाले.वरळी कोळीवाड्यात त्यानी एका छोटयाशा खोलीत आपला संसार थाटला.पुढे साने गुरुजी कथा मालेचे अध्यक्ष कै. केसरीनाथ पाटील यांच्याशी संपर्कात आले. त्यानंतर ते कथामालेशी जोडले गेले.साने गुरुजी कथामालेतून बाल व तरुण वर्गाला कथा निवेदन करून प्रबोधन करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,तीन मुले, व एक विधवा मुलगी, व नातवंडे असा परिवार आहे.त्यांनी मुलांना चांगले संस्कार व शिक्षण दिले. ती सर्व मुले उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर अधिकारी म्हणून काम करत आहेत.विजय धर्मराज रणदिवे स्वतः वकील असून मुंबई पोर्ट प्राधिकरण मधून ते सेवानिवृत्त झाले.मुंबई पार्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व कामगार दिवाळी अंकाचे सह संपादक म्हणून काम करीत आहेत.शरद रणदिवे हे महाराष्ट्र शासनात डायरेक्टर म्हणून उच्च पदावर कार्यरत आहेत. तिसरे चिरंजीव प्रमोद रणदिवे हे जीवन विमा महामंडळात कार्यरत आहेत.
कै. धर्मराज रणदिवे यांचे विशेष गुण, कणखर,करारी तरीही प्रसन्न व शांत व्यक्तिमत्व, स्वच्छ चारित्र त्यांचं वागण,बोलणं ,सामाजिक कार्य आणि कर्तृत्व त्यांच्या या अविस्मरणीय गोष्टीची आज आठवण येते.
जीवन कार्यामध्ये कै. धर्मराज रणदिवे यांनी समाजोपयोगी,लोकोपयोगी कामे केली. त्यांचा अनेक सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील संस्थांशी निकटचा संबंध होता.वरळी कोळीवाडा साने गुरुजी कथामालेचे उपाध्यक्ष होते.त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले.गुणवंत गिरणी कामगार पुरस्कार,दलित मित्र पुरस्कर मिळाले होते. खटाव तालुका विकास परिषदेचे पदाधिकारी व राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे कार्यकर्ते होते. विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून ते अखेर पर्यंत काम करीत होते.
करोना सारख्या महामारीवर मात करून खऱ्या अर्थाने ते कोविड योद्धा होते. कोविड काळात ते परिवारासह साताऱ्यात रहात होते.त्यांच्यापाशी मुलगी मंदाकिनी व तिची मुले अमोल व सोनाली होती.आजार पणामुळे यशवंत हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास ४ मार्च २०२३ रोजी घेऊन वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांचे अनुभव संपन्न आयुष्य नेहमीच प्रेरणादायक राहील.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये, जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, युनियनचे सर्व पदाधिकारी, गोदी कामगार, वरळी कोळीवाड्यातील साने गुरुजी कथामाला व सर्व बांधवातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांची आदरांजली सभा रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता वरळी कोळी समाज भवन, चौथा माळा, सागर गीत कॉलनी, मुंबई पोर्ट ट्रस्ट वसाहती शेजारी चेडदेव मंदिरा जवळ, वरळी कोळीवाडा मुंबई येथे होणार आहे.