परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन ‘अतिथी कोण?’ असे
विचारते. तेव्हा मुलं ‘मी आहे’ असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.
ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाता. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्याराशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.
कसे करावे पिठोरी अमावस्या व्रत?
नैवेद्याला वालाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुर्या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अश्या रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात.
श्रावण अमावास्येला उपवास करून सायंकाळी सर्वतोभद्र मंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना करावी, त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्ती देवतेच्या मूर्ती स्थापाव्यात.
तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून योगिनींचे आवाहन करावे. या चौसष्ट योगिनी म्हणजे उपजीवेकेसाठी उपयुक्त चौसष्ट कलाच आहेत. त्याचीच ही प्रतीके आहेत. त्यांची षोडशोपचार पूजा करावी.
अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात.
व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.
खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन ‘अतिथी कोण? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
पिठोरी अमावास्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धी, मुलांच्या सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी साठी ही पूजा केली जाते.