आर्थिक वर्ष २३च्या तिस-या तिमाहीत एयू स्मॉल फायनान्स बँकेकडून (‘एयू एसएफबी’/एयू’)कडून पुन्हा एकदा मजबूत आणि सातत्यपूर्ण कामगिरी-
सर्वाधिक तिमाही नफा ३९३ कोटी रूपये, पॅटमध्ये वार्षिक स्तरावर ३० टक्के आणि क्यूओक्यूवर १५ टक्के वाढ, मालमत्ता दर्जासही मोठ्या प्रमाणावर वाढ,
एकूण एनपीए १.८१ टक्के आणि निव्वळ एनपीए ०.५१ टक्के, ताळेबंद ८०,००० कोटी रूपयांपलीकडे.
२० जानेवारी २०२३:- एयू स्मॉल फायनानस बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज झालेल्या आपल्या सभेत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आर्थिक निकालांना मंजुरी दिली आहे.
क्यू३ एफवाय२३ साठी वार्षिक पातळीवर ३० टक्के निव्वळ नफा ३९३ कोटी रूपयांपर्यंत (कार्यान्वयन उपक्रमांमधून सर्वोच्च नफा); आरओई १५.२ टक्के असल्यामुळे नफा कायम/ क्यू३एफवाय२३ साठी १४.८%/ एफवाय२३ नवमाही मध्ये झाला आहे तर ठेवींमध्ये वाढ, तिमाही पातळीवर ५ टक्के आणि मार्च २२ पासून १६ टक्के वाढून ६१,१०१ कोटी रूपये झाली आहे. तसेच वार्षिक पातळीवर सीएएसए ठेवींमध्ये ३५ टक्के वाढ होऊन २३,४७१ कोटी रूपयांवर; सीएएसए दर ३८ टक्के आणि सीएएसए + रिटेल टीडी मिक्स ७० टक्के रूपये झाली आहे तर एकूण कर्जे वार्षिक पातळीवर ७% जास्त ₹ ५६,३३५ कोटी रूपयांवर- मार्च २०२२ पासून २० टक्क्यांची वाढ. बँकेने क्यू३ एफवाय२३ दरम्यान ११६४ कोटी रूपयांच्या मालमत्ता पोर्टफोलिओचे सिक्युरटायझेशन केले आहे.
आपल्या कामगिरीबाबत बोलताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अग्रवाल म्हणाले की, “एफवाय २३ चे क्यू३ ही सर्व महत्त्वाच्या निकषांवर तसेच शाश्वत व्यावसायिक वेग आणि मजबूत भांडवली पायामुळे आलेल्या शक्तिशाली आणि सातत्यपूर्ण कामगिरीची तिमाही होती. चलनवाढ आणि रोखता यांच्याभोवतीचे वातावरण आव्हानात्मक असतानाही आम्हाला मार्जिन कायम राखणे, कर्ज बाजारातील वाट्यात वाढ होणे, मालमत्ता दर्जा सुधारणे, उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करणे आणि त्याचवेळी आमच्यासाठी सर्वाधिक तिमाही नफा कमावणे शक्य झाले.
आम्ही सातत्याने शाश्वत बँक होण्याचे स्वप्न पाहून त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही अलीकडेच विविध प्रकारची प्रगतीशील एचआर धोरणे जाहीर केली. त्यातील काही महिला कर्मचा-यांसाठी पाळीच्या काळात रजा आणि आमच्या माजी कर्मचा-यांसाठी एयू फॉरएव्हर पास अशा प्रकारचे उद्योगातील पहिलेच उपक्रम होते. एयूला सलग तिस-या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून मान्यता मिळाली आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय)कडून एक्सलन्स इन कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठीही मान्यता मिळाली आहे. आम्ही अलीकडेच आमचा पहिला शाश्वतता अहवाल प्रकाशित केला. तो पीडब्ल्यूसीकडून मान्यताप्राप्त झाला आहे आणि आमच्या शाश्वततेच्या प्रवासात तो आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
माझ्या मते भारत हा देश जागतिक साथीनंतरच्या जगासाठी अत्यंत योग्य स्थानावर आहे. आपली उत्तम लोकसंख्या रचना, स्थिर लोकशाही रचना आणि इंडिया स्टॅकसारख्या तांत्रिक नवप्रवर्तनांचा वाढता परिणाम तसेच रचनात्मक आमूलाग्र बदल यांच्यामुळे भारताला जगात ज्ञान आणि तंत्रज्ञानातील नेतृत्वावर जाता आले आहे. एकूणात आमची बँक उगवत्या संधींचा लाभ घेण्यासाठी सक्षम आहे आणि बीटी- केपीएमजीकडून बेस्ट स्मॉल फायनान्स बँकची मान्यता आम्हाला आणखी प्रेरणा देते.