राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपण राज्यात नाखूश असल्याचं म्हटलं होतं. राज्यपालांच्या या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. नाखूश असेल तर आम्हीही सर्व नाखूश आहोत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित पावलं टाकावी हा आमचा महाराष्ट्रापुरता प्रयत्न आहे. काही राजकीय पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षातील काही गटांचा आघाडीत समावेश करावा, अशी इच्छा आहे. आम्ही चर्चेच्या स्थितीत आहोत. अंतिम निर्णय घेतलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही अनेक प्रश्नावर एकत्रित निर्णय घेतो. उद्याच्या निवडणुकीसाठीही एकत्रित भूमिका घ्यायला काही अडचण येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
राज्यात सुरू असलेल्या वादांवर पडदे पाडण्याचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्यात काही मतभेद असते तर गोष्ट वेगळी आहे. पण भाजप आणि काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिवसेना असे प्रश्न आले तर संघर्ष होणारच. ते काही थांबणार नाही, असं पवार म्हणाले.
सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची विधाने वेगळीच आहेत. काही लोक तुरुंगात टाकणार असं म्हणत आहेत. काही लोक जामीन रद्द करू असा इशारा देत आहेत. ही राजकीय नेत्यांची कामे नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपण राज्यात नाखूश असल्याचं म्हटलं होतं. राज्यपालांच्या या विधानाचीही त्यांनी खिल्ली उडवली. नाखूश असेल तर आम्हीही सर्व नाखूश आहोत, असा चिमटा त्यांनी काढला. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. चांगले राज्यपाल आम्ही पाहिले. पीसी अलेक्झांडरपासून अनेक उच्च दर्जाचे राज्यपाल होते, असं ते म्हणाले.
स्टेजवर नवरदेव आणि नवरी एकमेकांच्यासमोर उभे होते. नवरदेव विवेकने नवरी शिवांगीला हार घातला. त्यानंतर शिवांगीनेही विवेकला हार घातला. विवेकला हार घालताच शिवांगी कोसळली. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. हृदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं.