दुस-या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. या विजयसोबतच टीम इंडियाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला मायदेशात टी-20 मालिकेत पराभूत केले आहे. तसेच, तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 3 गड्यांच्या बदल्यात 237 धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने पहिले षटक मेडन टाकल्यानंतर दुस-या षटकात अर्षदिपने दोन विकेट्स घेतले. मात्र, त्यानंतर अॅडम माक्रमरम, क्विंटन डी काॅक आणि डेव्हिड मिलर यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 221 मजल मारली. मिलरने आपले वेगवान शतक पूर्ण केले मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
रोहितने रचना इतिहास
या मालिकेत विजयासोबतच कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत भारतात एकही टी-20 मालिका हरला नव्हता. परंतु रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. यासोबतच ही तीन सामन्यांची मालिकादेखील भारतीय संघाने आपल्या नावे केली आहे. भारतीय भूमीवर टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.