ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सीरिजचा तिसरा आणि अखेरचा सामना आज हैदराबादमध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा सहा विकेट्सनं विजय झाला आहे
हैदराबादमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या शेवटच्या आणि अखेरच्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा सहा विकेट्सनं विजय झालाय. टीम इंडियाला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. त्यावेळी विराट कोहली आणि हार्दिक पांड्या क्रीजवर होते. डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता. कोहलीनं पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. दिनेश कार्तिकने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताला शेवटच्या तीन चेंडूत चार धावा हव्या होत्या. त्याचवेळी चौथ्या चेंडूवर हार्दिकला एकही धाव करता आली नाही. पाचव्या चेंडूवर सॅम्सनं वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू हार्दिकच्या बॅटला लागला आणि फोर गेला. यावेळी टीम इंडियानं तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये मोठा विजय मिळवलाय.
विराट आणि सुर्यकुमार यादव यांच्यात १०० धावांची भागीदारी
आशिया चषकातील पराभवानंतर भारतीय संघ जोरदार ट्रोल झाला होता. पण बलाढ्य ऑस्ट्रेलियावरआजच्या तिसऱ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने मालिकाही २-१ अशी जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या रुपात दोन धक्के बसले. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळेच भारताला या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवता आली. सूर्याने यावेळी ६९ धावा केल्या, तर कोहलीने ६३ धावांची खेळी साकारली.
खेळपट्टीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करत भारतीय संघाला बांधून ठेवले होते. त्यामुळे भारताला मुक्तपणे फटकेबाजी करता आली नाही. पहिल्या पॉवर प्ले मध्ये सलामीवीर तंबूत परतल्याने भारतीय संघ अडचणीत आला. पहिल्या सहा षटकात भारत ५० धावा केल्या. लामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि सुर्याकुमार यादवने डाव सावरला आणि ३६ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या दहा षटकात ९१ धावा केल्या आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. कॅमेरून ग्रीनने तुफान फटकेबाजी करत ५ षटकात ६१ धावा करून दिल्या. १९ चेंडूत त्याने ५० धावा करत अर्धशतक साजरे केले. पण त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. त्यानंतर भारतीय संघ सामन्यात परत आला आहे. पहिले १० षटके ही दोन्ही संघांसाठी समसमान राहिली आहेत. आधीच्या फटकेबाजी नंतर भारतीय संघाने चार गडी बाद करत सामन्यात रंगत आणली आहे.